Created by Ashish, 13 February 2025
Jilha Nyayalay Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,जिल्हा न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.जिल्हा न्यायालयाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new recruitment advertisement has been published for various posts in District and Sessions Court. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application as soon as possible along with all the necessary documents through offline mode. |
◾भरतीचा विभाग : हि भरती जिल्हा न्यायालयाअंतर्गत निघाली आहे,सफाईगार पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : जिल्हा न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी
◾पदांचे नाव : सफाई कामगार
◾शैक्षणिक पात्रता : 04थी,07वी,08वी,09वी,10वी व 12वी पास
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- सफाई कामगार
1]उमेदवार भारताचा नागरिक असावा.
२]सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असणारा.
3]उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
4]वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
◾नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज 15 फेब्रुवारी 2025 पूर्वी पाठवावेत.
◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15000-47600 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://ratnagiri.dcourts.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾नोंदणीकृत डाक पोच पत्र (R.P.A.D.) किंवा शिघ्र डाक सेवा (Speed Post) व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातुन किंवा वरील नमूद केलेल्या दिनांका नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा तसेच लिफाफ्यावर ‘सफाई कामगार पदाकरीता अर्ज’ असे नमुद न केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच पोस्टाद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.
◾वेळेत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणेत येईल. अर्जाची छाननी केल्यावर पात्र ठरलेले अर्ज जास्त प्रमाणात असल्यास भरती प्रक्रिया समिती योग्य ते निकष लावून अर्हता/योग्यतेच्या आधारे सफाईकामगार पदासाठी अल्पसुची तयार करेल. अशी अल्पसूची (shortlist) तयार करण्याचे आणि निवड प्रक्रियेचे सर्व अधिकार भरती प्रक्रिया समिती यांचेकडे असणार आहेत. अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल.
◾उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी (असल्यास), जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूक रित्या नमूद करावे.
◾मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
◾उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, अटी आणि निकष पूर्ण केले असतील अशा उमेदवारांचे अर्ज पुढील प्रक्रीयेकरीता योग्य ठरविणेत येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारांनी पदस्थापनेबाबत / स्थळाबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास किंवा पदस्थापनेबाबत विनंती केल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.